होळी आणि रंगपंचमीसाठी राज्य सरकारनी जाहीर केले निर्बंध

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला आहे आणि त्यामुळे निर्बंधही कमी झाले आहेत. निर्बंध कमी झाल्याने नागरिक आता मोठ्या उत्साहात होळी, धुळवड साजरी करण्याचा बेत आखत आहेत.
तुम्हीही तसाच बेत आखत असाल तर मग जर थांबा. कारण, होळी आणि धुळवड साजरी करण्याच्या संदर्भात राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. राज्याच्या गृह खात्याकडून ही नियमावली जाहीर करण्यात आली असून त्या संदर्भातील नियमांचे पालन नागरिकांना करावेच लागणार आहे.

या नियमावलीनुसार, रात्री 10 वाजल्यानंतर होळी साजरी करता येणार नाहीये. तसेच डीजे लावण्यासही बंदी घालण्यात आली आहे. सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत आणि त्यामुळेच डीजे न लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. होळी आणि रंगपंचमी / धुळवड साजरी करत असताना मद्यपान करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. रंगपंचमी किंवा धुळवड साजरी करत असताना अनेक ठिकाणी खासकरुन शहरी भागात रंगांच्या पाण्याने भरलेले फुगे किंवा पिशव्या मारल्या जातात. मात्र, असे करत असताना अनेकदा दुर्घटनाही घडल्याचं समोर आलं आहे. त्यामुळेच यंदा धुलवडीच्या दिवशी जबरदस्तीने रंग किंवा पाण्याने भरलेले फुगे मारू नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्य शासनाची नियमावली

रात्री 10 वाजण्याच्या आत होळी करावी 10 वाजण्याच्या आधी होळी लावणं बंधनकारक असणार आहे. त्यानंतर परवानगी नसणार होळी साजरी करताना डीजे लावण्यास बंदी असणार होळी साजरी करताना डीजे लावल्यास कायेदशीर कारवाई होणार दहावी आणि बारावीच्या परीक्षा सध्या सुरू आहेत आणि त्यामुळे लाऊड स्पीकर जोरजोरात न लावण्याच्या सूचना धुलवडीच्या दिवशी जबरदस्तीने रंग किंवा पाण्याने भरलेले फुगे मारू नयेत. कुठल्याही जाती किंवा धर्माच भावना दुखावल्या जातील अशा घोषणा देऊ नये,

यादिवशी होईल होळी आणि रंगपंचमी

यंदाच्या वर्षी होळी 17 मार्च रोजी आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 18 मार्च रोजी रंगपंचमी आहे. तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पाच दिवसांनी धुळवड साजरी करण्यात येत असते.