वऱ्हाडी घेवुन जाणारे वाहन पलटुन दोन ठार

9 जखमी: जखमींवर उपचार सुरू

चिमूर (प्रतिनिधी) : तालुक्यताील भिसी येथुनःलग्नाचे वऱ्हाडी घेऊन जाणारे क्रूझर वाहन पलटल्याने दोन जण ठार तर नऊ जण जखमी झाल्याचीघटना रविवारी (23 मे) चिमूर तालुक्यातील भिसी-आंबोली मार्गावर पुयारदंड गावाजवळ घडली. कमल मानकर वय 70 वर्षे रा. आंबोली व श्रीराम राजेराम मानकर वय 52 वर्षे असे अपघातात मृत्त पावल्यांची नावे आहे.

चिमुर तालुक्यातील भिसी येथुन आंबोली येथे लग्नाचे वऱ्हाड घेऊन क्रूझर क्रं. एमएच ३२ एएच 0957 या वाहन जात होते. दरम्यान पुयारदंड गावाजवळ आले असता वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी खाली, सदर घटनेत कमल मानकर वय 70 वर्षे रा. आंबोली व श्रीराम राजेराम मानकर वय 52 वर्षे ठार झाले तर वाहनचालक अमोल किसन वाघ वय २७ वर्षे रा. भिसी, गार्गी संजय मानकर वय ४ वर्षे, लक्ष्मण गायकवाड वय ६७ वर्षे, स्वाती मानकर वय 21 वर्षे, शांता दडमल वय ४9 वर्षे, ज्योत्स्ना मानकर वय ३७ वर्षे, नीळकंठ जांभुळे वय ५७ वर्षे, भगवान गुडधे वय ७० वर्षे रा. सर्व आंबोली हे जखमीं झाले आहेत. या घटनेची माहिती भिसी पोलिसांना मिळताच सहायक पोलीस निरीक्षक जांभळे पोलीस उपनिरीक्षक सचिन जंगम घटनास्थळी दाखल झाले.

जखमींवर भिसी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून नागपूरला हलविण्यात आले आहे.