वाघाचा तात्काळ बंदोबस्त करून शेताजवळील जंगल परिसराला सोलर कुंपन लावा: गावकऱ्यांची मागणी

वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक रामगांवकर यांच्याकडे केली मागणी

मूल (प्रतिनिधी) : तालुक्याला लागुन ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे कोर क्षेत्र, रिझर्व फॉरेस्ट असल्यामुळे याठिकाणाहुनच मोठया प्रमाणावर वाघाचे गावाकडे आगमन होत असुन अनेकांना आपला जिव गमवावा लागला, यामुळे  वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा व जंगल परिसराला सोलर कुंपन लावण्यात यावे अशी मागणी पडझरी, भादुर्णा, उश्राळा, उश्राळा चक, मारोडा यागावातील नागरीकांनी माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या नेतृत्वात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक रामगांवकर यांच्याकडे केली आहे.

गेल्या काही दिवसांपासुन तालुक्यातील पडझरी, भादुर्णा, उश्राळा, उश्राळा चक, मारोडा या गावातील काही व्यक्ती वाघाच्या हल्लात ठार झाले, यामुळे संपुर्ण कुटुंब वाऱ्यावर पडलेले आहे, यामुळे वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरीकांकडुन केली आहे, यासह गावासभोवताल असलेले झुडुप कापुन जागा त्वरीत मोकळी करण्यात यावे, बफर झोन परिसरात असलेल्या गावातील शेतकऱ्याना निस्तार हक्काचा अधिकार कायम असल्यामुळे त्यांना लागणाऱ्या जंगलाच्या वस्तु मिळण्यास वनविभागाने अडथळा आणु नये, रानडुक्करामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान होत आहे, त्यामुळे 100 टक्के अनुदानावर सोलर कुंपन लावुन देण्यात यावे  यासोबतच गावाजवळ नविन रोपवण तयार करण्यात येवु नये असा मागणीचे निवेदन देण्यात आले.

निवेदन देताना माजी मंत्री शोभाताई फडणवीस, मारोडा येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक लोकनाथ नर्मलवार, मारोडाचे सरपंच भिकारू शेंडे, सचिन गुरनुले, नरसिंग गणवेनवार, भादुर्णाचे सामाजिक कार्यकर्ते, विक्रम गुरनुले, उश्राळाचे सुरेश नेवारे, पडझरीचे नागो नागोशे, शांताराम कन्नाके, परशुराम मडावी, संजय पेंदोर भादुर्णाचे नागेश वाढई उपस्थित होते.