मूल (प्रतिनिधी) : अर्जात त्रुटया असल्याचे कारण पुढे करून गरजु, वृध्द आणि निराधारांची दलालाकडुन आर्थीक लुट होत आहे. यामुळे नागरीकांनी कोणत्याही दलालाशी आर्थीक व्यवहार करू नयेे असे आवाहन संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य राकेश ठाकरे यांनी केले आहे. Citizens should not do financial transactions with brokers : Rakesh Thackeray
निराधार, अपंग, वृध्दापकाळ व्यक्तींसाठी शासनाने निराधार योजनेच्या माध्यमातुन आर्थीक सहाय्य केले जाते, संजय गांधी निराधार योजना समितीच्या माध्यमातुन अर्जदारांचे अर्ज मंजुर केले जाते, सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना श्रावणबाळ, वृध्दापकाळ, संजय गांधी निराधार योजना आणि इंदिरा गांधी निराधार योजनेचे अर्ज सादर करताना तहसील कार्यालय परिसरातील दलाल अर्जात त्रुटया असल्याचे कारण पुढे करून लाभार्थ्यांकडुन आर्थीक लुट करीत आहे. baseless scheme
नागरीकांनी अर्ज करताना आवश्यक संपुर्ण कागदपत्र अर्जासोबत जोडावे काही अडचणी उद्भवल्यास समिती सदस्यांशी संपर्क साधावा असे आवाहन संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य राकेश ठाकरे यांनी केले आहे.