नगरात ’पम्प लाऊन पाण्याच्या चोरीचे प्रमाण वाढले’
सुधाकर दुधे सावली
नळ कनेक्शनचे उद्दिष्ट पूर्ण होण्याआधीच शहरात सुरु असलेली साधी आणि फिल्टरचा पाणी पुरवठा योजना खंडित केल्याने शहरात पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे, दरम्यान दोन्ही जुन्या नळ योजनेचा पाणी पुरवठा बंद झाल्याने आणि नगरात कमी दाबाने नव्या पाणी पुरवठयाला सुरुवात झाल्याने मिळना ऱ्या कमी पण्यामुळे नवीन पाणी पुरवठा योजना डोकेदुखी ठरत आहे मात्र यागंभीर बाबीकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसते त्यामुळे नगरातील अनेक प्रभागामधे कमी दाबाचा पाणी पुरवठयामुळे पाण्याची समस्या निर्माण होत आहे परिणामी नगरात पाण्यासाठी बोम्ब सुरु आहे मात्र घरी ना बेरवेल ना विहीर तरीही धनदांडग्याच्या दुस ऱ्यामाळयावरील सिंटेक्स हाउसफुल होताना दिसुन येत आहे. पम्प लाऊन पाण्याची चोरी सुरु असल्याने याचा फटका सर्वसामान्य नागरीकांना होत आहे. Saoli Nagar Panchayat
ग्राम पंचायतच्या काळात शहरात पाण्याची सुविधा निर्माण व्हावी म्हणून साधी नळ योजना कार्यान्वीत करण्यात आली होती, त्यामुळे पाण्याची समस्या काही प्रमाणात दूर झाली, त्यातही साध्या नळ योजनेचा नेहमीचा लपंडाव सुरु झाल्याने, शहरात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली, यावर रामबाण उपाय म्हणून ग्राम पंचायतने फिल्टरची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली, मात्र दोन्ही पानी पुरवठा योजना योग्य रीतीने चालू राहु शकल्या नाही, त्यामुळे सावली शहरात नेहमीच पाण्याची मोठी समस्या निर्माण होत होती, पाण्यासाठी शहर वाशियानी अनेक आंदोलन, निवेदने दिली, त्यापलीकडे जाऊन घागर मोर्चाही काढण्याची अनेकदा वेळ निर्माण झाली, दोन्ही नळ योजनेमुळे सार्वजनिक विहीरी, हैंडपंम्प याकडे प्रशासनाचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाल्याने, ४० वर्षा पासून पाणी पाजणाऱ्या विहीरी दूषित झाल्या, पाणी पिण्यास अयोग्य अशा सूचना प्रशासनाने विहिरीवर प्रकाशित केली, त्यामुळे विहिरिच्या पाण्याचा उपयोग केवळ कपड़े धुण्यासाठी केला गेला, एकीकडे कार्यान्वित दोन्ही नळ योजनेचा सातत्याने सुरु असलेला लपंडाव यासोबतच विहिरीचे पाणी पिण्यास अयोग्य अशा परिस्थितीत शहरात पाण्याची मोठी समस्या, निर्माण होताना शहरात शुद्ध पाण्याची व्यवस्था निर्माण व्हावी, म्हणून आमदार विजय वड्डेटिवार यांच्या पुढाकाराने सावली शहरात विद्यमान नगर पचायतीने पुढाकार घेत जलशुद्धीकरण केंद्रातंर्गत वाढीव पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत करण्यात आली, शहरात पाणी पुरवठा सुरु झाला मात्र अनेक प्रभागात कमी दाबाच्या पाणी पुरवठ्यामुळे नवी पाणी पुरवठा योजना नगर वासियासाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यातही इलेक्ट्रीक मोटर लाऊन पाणी चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने नगरात पाण्याची भिषण समस्या निर्माण होत आहे. MLA Vijay Wadettiwar
सावली शहरातील पाण्याची समस्या दुर करण्यासाठी नामदार विजय वडेट्टीवार यांनी सुमारे 12 कोटी रूपयाची नळ योजना सुरू केली आहे, शहर वासीयांना पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने नगरपंचायत लक्ष देत आहे, पाणी चोरटयांवर नगर पंचायत कार्यवाही सुध्दा करीत असल्याची प्रतिक्रिया सावली नगर पंचायतचे स्वच्छता, आरोग्य व पाणीपुरवठा सभापती प्रितम गेडाम यांनी दिला. Pritam Gedam